मी अपयशी ठरलो, कारण कोणताही व्यक्ती निर्णय घेतो तेव्हा अंतिम निर्णय त्याचाच असतो. मला इतरांकडे बोट दाखवायला आवडत नाही. मी अयशस्वी झालो कारण मला त्या क्षेत्राची कल्पना नव्हती. जर तुम्ही मला 20 वर्षांपूर्वी विचारले असते, तर मला क्रिकेटबद्दलच्या या सर्व गोष्टी माहित नसत्या, ज्याबद्दल मी आज बोलत आहे. हा सर्व अनुभवाचा विषय आहे. आधी एक-दोन वर्षे माणसाबरोबर घालवा, बघा दोन्हीचे गोष्टी जुळतात की नाही.
मला लग्न करायचं आहे तेव्हा...
लग्न हा माझ्यासाठी एखादा सामना आहे. सध्या माझा घटस्फोटाचा खटला सुरू आहे, तो पूर्ण झाल्यावर जेव्हा मला लग्न करायचे आहे. तेव्हा माझी मानसिक तयारी असेल. सर्व गोष्टींची मला कल्पना असेल. तेव्हा मी माझा असा जोडीदार निवडू शकेन की तो मला आयुष्यभर साथ देईल. जेव्हा मी 26-27 वर्षांचा होतो त्यावेळेस मी क्रिकेट खेळत होतो. या गोष्टीशी माझा काही संबंध नव्हता. जेव्हा मी प्रेमात पडलो तेव्हा मला लाल झेंडे दिसत नव्हते, पण आता मी प्रेमात पडलो तर मला ते लाल झेंडे दिसतात. लाल झेंडे असतील तर मी त्यातून बाहेर पडेन.