बेळगाव : आज गुरुवारी (18 फेब्रुवारी) सायंकाळपासून सुरु असलेल्या वळीव पावसावेळी वीज पडून खानापूरात एक युवक ठार झाला आहे. खानापूर तालुक्यातील निडगल गावात ही घटना घडली आहे. गुरुनाथ पांडूरंग नार्वेकर (वय 20, रा. असू गाव, जोयडा तालुका, उत्तर कन्नड जिल्हा) असे वीज पडून मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
मयत युवक आपल्या कुटुंबासोबत निडगल गावात वीट भट्टीवर काम करण्यासाठी आला होता.गुरुवारी सायंकाळी पावसाला सुरुवात होताच विटांच्या राशीवर प्लास्टिक ओढण्यासाठी गेला असता त्याच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. खानापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.