बेळगाव : धामणे गावातील शेतकरी आपल्या शेतात पिकवलेली भाजी घेऊन वडगाव बाजार गल्ली, चावडी गल्लीच्या बाजूला भाजी विकण्यासाठी बसल्याने तेथील आजूबाजूच्या भाजी विक्रेत्यांनी मंगळवारी (26 जानेवारी) त्यांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. शेतकरी मारुती रेमाणाचे याला हे या मारहाणीत जखमी झाले आहेत. त्या शेतकऱ्याने वडगाव येथील शेतकऱ्यांना हि बाब कळाल्यावर आजूबाजूच्या भाजी विक्रेत्यांनी जबर मारहाण केल्याचे सांगितले. त्यानंतर शहापूर पोलिस ठाण्यात तक्रार करत मारहाण केलेल्यावर कारवाई करावी अशी विनंती करत पुन्हा असे प्रसंग घडूनयेत याची दक्षता आपण घ्यावी अशी तेथील पोलीस अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.
मागील वर्षी याच बाजार गल्लीतील भाजी, फळ, हार विक्रेते व दुकानदारांनी केलेले अतिक्रमण हटवावे म्हणून मनपा आयुक्त शशिधर कुरेर यांना निवेदन दिले होते. पण तात्पुरती कारवाई करुन परत आधीपेक्षा जास्त आता अतिक्रमण झाल्याने शहापूर, वडगाव रयत गल्लीतील बैलगाड्या, ट्रँक्टर शहापूर, वडगाव शिवारात जाताना भरपूर अडचण होते. त्यामूळे बाजार गल्लीत केलेले मास्टरप्लँन हे जनतेसाठी कि त्या विक्रेते व दुकानदारांसाठी... ?
बाजार गल्ली कायमची खुली करत जनतेच्या व शेतकऱ्यांच्या येण्या-जाण्यासाठी ताबडतोब सोय करावी यासाठी गुरुवारी (28 जानेवारी) सकाळी मनपा आयुक्तांना पुन्हा बेळगाव तालूका रयत संघटना तसेच शेतकऱ्यांसमवेत निवेदन देण्यात येणार आहे. जर तेथील अतिक्रमण हटले नाही तर शेतकरी बैलगाड्या, जनावरं आणून बाजार गल्लीत आंदोलन करतील असा इशाराच देण्यात येणार आहे.