बेळगाव : जमिनीच्या लोभातून बालकाचा निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी (20 जानेवारी) सौंदत्ती तालुक्यातील हारुगोप्प या गावामध्ये घडली होती. मारुती वीरेश संकन्नावर (वय 4) असे मृत बालकाचे नाव आहे. संपत्तीच्या वादातून बालकाचा निर्घुण खून केल्याच्या आरोपाखाली संशयित आरोपी काकाला चार दिवसांत अटक करण्यात मुरूगोड पोलिसांना यश आले आहे. पुतण्याच्या खूनप्रकरणी इराप्पा बसाप्पा संकन्नावर (वय 38) असे अटक केलेल्या आरोपी काकाचे नाव आहे.
संशयित काका इराप्पा हा खूनानंतर फरार झाला आहे. घरात कोणीही नसताना आणि मुलगा दारातच खेळत असताना खूनाची घटना घडली आहे. मृत बालकाचे वडील आणि संशयित आरोपी इराप्पा यांच्यात जमीनीचा वाद आहे. त्याच वादातून धाकट्या काकानेच पुतण्याचा खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मुरगोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. हत्येच्या चार दिवसानंतर पोलिसांना अटक आरोपी सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी गावात असल्याची माहिती मिळाली आहे. पीएसआय प्रवीण गंगोळ यांनी सांगितले की, आरोपीला अटक केली गेली आहे आणि न्यायालयीन कारवाई सुरु आहे.
अधिक माहिती : आरोपी इराप्पा आणि मुलाचे वडील वीरेश हे एकाच कुटुंबातील भाऊ आहेत. आजोबांच्या काळापासून 20 एकर शेतजमीन होती. ते चौघे भाऊ होते आणि प्रत्येकाला 5 एकर जमीन देण्यात आली होती. अधिकृत मालमत्तेचा वाटा झाला नव्हता. आरोपी इराप्पा हा नेहमीच मुलाचे वडील वीरेश यांच्याशी भांडत होता. बर्याच दिवसांपासून वीरेशच्या कुटूंबाचा बदला घेण्यासाठी थांबलेल्या आरोपीने आज सकाळी मुलाचे कुटुंब शेताकडे जाताना पाहिले. तसेच, मुलगा आपल्या बहिणीबरोबर खेळताना आढळला आणि त्याने हत्येचा निर्णय घेतला. त्याच्या गळ्यावर डोक्यावर हल्ला करण्यात आला. यातच कोसळलेल्या मुलाचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू होताच आरोपी तिथून फरार झाला. मुरुगोड पोलिस या प्रकरणातील आरोपीचा शोध घेत आहेत.