बेळगाव—खानापूर : लष्करातील भरती रखडल्याने देशभरात युवकांच्या संताचा उद्रेक होत आहे. तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली. रामा गंगाराम नावगेकर (वय 24) असे तरुणाचे नाव आहे. त्याने सैन्य भरतीसाठी जोरदार प्रयत्न केले होते.
इतरही अनेक ठिकाणी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात त्याला यश आले नाही. यातून आलेल्या नैराश्यातून त्याने राहत्या घरी कुणी नसताना गळफास घेतला. खानापूर पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.