बेळगाव : पावसामुळे बहुतांश रस्ते खड्डेयुक्त बनले आहेत तर काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे बेळगाव शहरातील नागरिक संथ गतीने सुरू असलेल्या विकासकामांनी हैराण झाले आहेत.गटारीच्या मध्येच विजेचा खांब कसा आला...?काय गटारीनेच खांब्याच्या जागेवर कब्जा मिळवला हे एक आश्चर्यच आहे. शास्त्रीनगर येथील गटाराच्या कामात अडथळा येणारा विजेचा खांब. आता खांब काढणे म्हणजे त्या स्मार्ट गटारीला धोका पोहचविण्यासारखे आहे. कारण खांब काढायचा झाल्यास खोलवर जमीनीत रोवलेला खांब काढावाच लागेल.
महापालिकेची स्मार्ट सिटी अंतर्गत बेळगाव शहरात कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक, पादचारी तसेच वाहनचालक यांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे.सूचना फलकांचा अभावकोणतीही विकासकामे करताना रस्त्याच्या बाजूला नागरिकांसाठी सूचना फलक लावणे गरजेचे आहे. परंतु शहरातील बहुतांश ठिकाणी विकासकामे करताना सूचना फलक लावण्यात येत नाहीत. त्यामुळे नागरिक अथवा वाहनचालक यांना अपघात होण्याची शक्यता आहे.