बेळगाव : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुका कर्नाटकचा असल्याचा दावा केल्यानंतर जिल्ह्यातून संताप व्यक्त होत आहे. कर्नाटकातील 885 मराठी बहुभाषिक गावे अगोदर महाराष्ट्राला द्या, मग कन्नड गावांचे बोला, असा इशारा सीमा लढ्यातील कार्यकर्त्यांनी दिला असून जत तालुक्यातील राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी बोम्मई यांच्या दाव्यास तीव्र विरोध दर्शविला. दुसरीकडे महाराष्ट्रातील नेत्यांची सभा घेण्यास देऊ नये आमच्या राज्यात राहतात, सरकारच्या सर्व सुविधा घेतात आणि महाराष्ट्रात जाण्यासाठी लढा देतात. ही महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणजे रोहिंग्या असून राज्यद्रोही समितीला कर्नाटकातूक हाकलून लावा, अशी गरळ कन्नड संघटनेचा म्होरक्या भीमाशंकर पाटील याने ओकली आहे.
सीमाप्रश्नी न्यायालयात सुनावणी होणार असल्यामुळे त्या संघटनांची वळवळ वाढली असून म. ए. समितीविरोधात गरळ ओकण्यात येत आहे. कर्नाटकाच्या विधिमंडळ अधिवेशनाविरोधात समितीला महामेळाव्याला परवानगी देण्यात येण्यात येऊ नये. महाराष्ट्रातील नेत्यांची सभा घेण्यास देऊ नये, अशा मागण्या त्याने केल्या असून म. ए. समितीला रोहिंग्या ठरवून त्यांना हद्दपार करावे, अशी गरळ ओकली आहे.