भारतात गेल्या 24 तासांत 7964 नवे रुग्ण आढळले असून देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 1,73,763 वर पोहोचली आहे. देशात सद्य स्थितीत 86,422 रुग्णांवर उपचार सुरु असून 82,370 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4971 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
Ministry of Health and Family Welfare
एकीकडे कोरोना व्हायरस (Coronavirus) सारख्या भीषण विषाणूने संपूर्ण भारताला आपल्या जाळ्यात अडकवले असून दुसरीकडे जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) च्या कुलगाम जिल्ह्यात दहशवादी आणि भारतीय सैन्यामध्ये जोरदार चकमक सुरु आहे. कुलगाम जिल्ह्यातील वानपोरा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या सैन्यामध्ये जोरदार चकमक सुरु आहे.
तर दुसरीकडे भारतात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 1,73,763 वर पोहचला आहे. आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात सद्य घडीला 86,422 कोरोना ऍक्टिव्ह प्रकरणे असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत तर आतापर्यंत 86,422 रुग्णांची कोरोनावर मात केली आहे. या आकडेवारीनुसार, भारताने चीन ला कोरोना रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत मागे टाकले आहे.
महाराष्र्टात एकाच दिवशी कोरोनामुक्त झालेल्या विक्रमी 8381 रुग्णांना डिस्चार्जकोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने आज उच्चांक गाठला. एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून त्यातील सर्वाधीक 7358 रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत राज्यभरात 26 हजार 997 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
29 मे रोजी कोरोनाच्या 2682 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 33 हजार 124 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 4 लाख 33 हजार 557 नमुन्यांपैकी 62 हजार 228 जण पॉझिटिव्ह आले आहेत.