बेळगाव : आपल्या मनासारखं झालं नाही किंवा एखाद्या गोष्टीचा त्रास झाला, की आपण नेहमी चिडचिड करतो. त्यावेळी सत्तेत असलेल्या सरकारवर तासनतास चर्चा करतो. ही चिडचिड होऊ नये म्हणून सरकार निवडण्याचा आपला हक्क मात्र अनेक जण बजावताना दिसत नाही. पुढील 3 वर्षे आपल्याला त्रासदायक ठरू नयेत असं वाटत असेल, तर आपल्या आयुष्यातला एक तास काढून मतदान हे करायलाच हवं. तासनतास फक्त चर्चेपेक्षा एक तास मतदानासाठी; हे केव्हाही योग्यच !
आज शनिवारी शाई लागलेलं तुमचं बोट हक्कानं सर्वांना दाखवा आणि अभिमानानं सांगा की, 'होय मी मतदान केलंय.'
Photo : श्रीराम सेना हिंदूस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर मतदान केल्यानंतर
बोटाक लावली जणारी शाई ही शेल्फीची सोय नाय तर आपला कर्तव्य पुरा केल्याची जाणीव असा..
तर हे कर्तव्य पुरा करून देशाचा भविष्य उज्ज्वल करूक हातभार लाव रे राजा..
व्हय रे महाराजा..
देशातल्या या सगळ्यात मोठ्या उत्सवाचा भाग होणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. मतदान न केल्यास आपण ठामपणे आपल्या हक्कांविषयी बोलू शकत नाही. ज्यावेळी बेळगावा लोकसभा पोटणीवडणूकीत 100% मतदान होईल तो लोकशाहीचा खऱ्या अर्थानं विजय असेल. मतदान करणं ही सगळ्यात मोठी राष्ट्रसेवा आहे आणि ती आपण केलीच पाहिजे.
मतदार राजा, आपल्या बोटाला लागणारी शाई ही आपल्या भारतीयत्वाची निशाणी आहे, ती तू आपण मानानं मिरवायला हवी...
म्हणून उठ आणि मतदान कर!
येत्या 17 एप्रिलला मी मतदान करणार आहेच, तुम्हीही करा! आपण नेहमी वाचतो की, बेळगावात मतदान कमी होतं. पण, आपल्या सर्वांना एकत्र येऊन हे विधान बदलायचं आहे. बेळगावात मोठ्या संख्येनं मतदान व्हायला हवं.
हक्क नव्हे, कर्तव्य!
मी मतदान करणार...कारण, हा हक्क नव्हे, तर आपलं कर्तव्य आहे.
मी मतदान करणार...कारण, माझ्या एका मतानं काय होणार? असा विचार करून मला आणि तुम्हालाही अजिबात चालणार नाही.
मी मतदान करणार...कारण, लोकशाही बळकट व्हावी म्हणून आपलं प्रत्येकाचं मत नोंदवलंच गेलं पाहिजे.
मी मतदान करणार...कारण, सुजाण नागरिक म्हणून स्वतः मिरवत असताना मतदानाचा हा हक्क आपण आपलं कर्तव्य म्हणून बजावणं अत्यंत आवश्यक आहे.