बेळगाव : सर्पदंश होऊन शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना अलारवाड येथील शेतवडीत घडली. श्रीनिवास भाऊराव गुंडाण्णाचे (वय 51, रा. शहापूर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. घटनेची नोंद श्रीनिवास गुंडाण्णाचे माळमारुती पोलिस स्थानकात झाली आहे. श्रीनिवास हे आपल्या मुलासमवेत अलारवाड क्रॉसजवळ असणाऱ्या शेतवडीत भात पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. दरम्यान पाहणी करुन येत असताना त्यांना सर्पदंश झाल्याचे माहिती झाले नाही.
ते शेतातून रस्त्यावर आले असता अचानक चक्कर येऊन कोसळले. व त्यांच्या तोंडातून फेस आला. याची माहिती त्यांच्या मुलांने घरच्यांना दिली. कुटुंबियांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता. रात्री उशीरा जिल्हा रुग्णालयातील शवागारात त्यांच्यावर शवचिकित्सा करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे.