बेळगाव : किणये (ता. बेळगाव) गावातील शेतकरी महिलेचा विद्युतभारित खांबाला स्पर्श होऊन मृत्यू झाला. यल्लुबाई परशराम जागृत (वय 65) असे सदर महिलेचे नाव आहे. सदर घटना बुधवारी (21 ऑक्टोबर) सायंकाळी 7 च्या सुमारास घडली. यल्लुबाई जागृत व त्यांची सून शेताला गेल्या होत्या. दिवसभर काम आटोपून घरी येत असताना रस्त्याकडेला असलेल्या वीजखांबाला स्पर्श होऊन यल्लुबाई यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यांच्या मागोमाग येणाऱ्या सुनेलाही किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. या अपघाताची नोंद बेळगाव ग्रामीण पोलिस स्थानकात झाली आहे.