'या' राज्यातील भाजप सरकार संकटात, चार मंत्र्यांचे राजीनामे

'या' राज्यातील भाजप सरकार संकटात, चार मंत्र्यांचे राजीनामे

belgavkar.com | belgaum | belgavkar

मणिपूरमधील भाजप नेतृत्वातील सरकार संकटात आलं आहे. या सरकारधील उपमुख्यमंत्री वाय जॉय कुमार सिंह यांनी राजीनामा दिलाय. त्यांच्यासह नॅशनल पिपल्स पार्टीच्या तीन मंत्र्यांनीही राजीनामा दिलाय. मणिपूरमधील भाजपचे मुख्यमंत्री एम. बिरेन सिंह सरकारवर अस्थिरतेचं संकट घोंगावू लागलंय. यासह एक टीएमसी आमदार आणि एका अपक्षानेही सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे.
उपमुख्यमंत्री वाय जॉय कुमार सिंह यांच्याशिवाय तीन मंत्र्यांनी राजीनामा दिलाय. त्यात आदिवासी विकासमंत्री एन कायिसी, क्रीडा मंत्री लेतपाओ हाओकिप आणि आरोग्यमंत्री एल जयंत कुमार सिंह यांचा समावेश आहे. मणिपूर सरकारमध्ये वाय जॉय कुमार सिंह हे अर्थमंत्रीही होते. भाजपला रामराम करत एस. सुभाषचंद्र सिंह, टी. टी. हाओकिप आणि सेम्युअल जेंदाई यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.
मुख्यमंत्र्यांकडे दिले राजीनामे
मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्याकडे चारही मंत्र्यांनी राजीनामा दिलाय. जॉय कुमार, हाओकिप आणि कायिसी या मंत्र्यांनी स्वतंत्रपणे मुख्यमंत्र्यांकडे राजीनामे सोपवले. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सोपवला आहे, अशी माहिती राजीनामा दिल्यानंतर जॉय कुमार सिंह यांनी दिली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

'या' राज्यातील भाजप सरकार संकटात, चार मंत्र्यांचे राजीनामे

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm