बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कल्लेहोळ क्रॉसजवळ अज्ञातांनी बिअरच्या बाटलीने हल्ला करून खून केलेल्या युवकाच्या खून प्रकरणाचा तपास लवकरच लागणार आहे. या प्रकरणी काकती पोलिसांनी आतापर्यंत बेळगाव शहरासह उचगाव, बेळगुंदी, कल्लेहोळ, हलगासह अन्य काही गावांमध्ये चौकशी केल्याचे समजते. कॉल डिटेल्सवरून आतापर्यंत पोलिसांनी सुमारे 10 ते 15 जणांची चौकशी करण्यासाठी यादी बनवली आहे. यापैकी काहींची चौकशी झाली असून, आता धागेदोरे मिळाले आहेत. कल्लेहोळ क्रॉसजवळ गुरुवार (14 ऑक्टोबर) रोजी रामचंद्र लक्ष्मण कणबरकर (वय 31, रा. उचगाव) हा तरुण अत्यवस्थ स्थितीत पडला होता.
त्याच्या डोक्यात कोणीतरी बिअरच्या बाटलीने मारल्याने बेशुद्ध होऊन रात्रभर तो येथेच पडला असावा. दुसऱ्या दिवशी पहाटे त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान दसर्या दिवशी मृत्यू झाला. बेळगाव शहरातील मुजावर गल्ली (श्री शिवाजी रोड), कोनवाळ गल्लीसह बेळगाव तालुक्यातील बेळगुंदीसह अनेक गावांतील युवकांची चौकशी पोलिसांनी केली असून याप्रकरणी मुजावर गल्लीतील मुख्य संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलयं. बुधवार (13 ऑक्टोबर) रोजी सायंकाळी 6 वाजता रामचंद्र आपल्या घरातून बाहेर पडला होता. रात्री वेंगुर्ला रोडवरील एका धाब्यावर तो जेवणाला गेला होता. धाब्यावर मित्रांबरोबर झालेल्या भांडण व वादावादीनंतर खुनाचा हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून तपास हाती घेतला आहे. वेंगुर्ला रोडवरील ढाब्यावर जेवताना झालेल्या वादावादीतून त्याच्या डोक्यात बिअरच्या बाटलीने वार केल्याचा संशय आहे.
त्याच्या मोबाईलवर आलेल्या कॉल डिटेल्स्वरून तब्बल अनेकांची जणांची चौकशी होणे बाकी आहे. त्यानंतरच हे जाहीर केले जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या खून प्रकरणी पोलिसांनी काही ठिकाणचे सीसीटीव्ही जमा केले आहेत. यामध्ये एका 20 - 22 वर्षीय तरुणाचा चेहरा स्पष्ट दिसत होता. त्याला पोलिसांनी जाळे रचून ताब्यात घेतले आहे. ही घटना घडल्यापासून तो फरारी असल्याने पोलिसांना अद्याप सापडलेला न्हवता. तो सापडल्यानंतर आता त्याची चौकशी सुरु असून त्यानंतरच खुनाचे कोडे उलगडेल, असा विश्वास पोलिसांना आहे.
विठोबाचे भक्त रामचंद्ररामचंद्र हा दारू प्यायला लागल्याने त्याच्या कुटुंबाने पंढरपूर येथे जावून त्याला माळही घातली होती. त्यानंतर दारू सोडलेला रामचंद्र मित्रांसोबत संगतीने दोन महिन्यांनी पुन्हा दारु प्यायला लागला. त्यामुळे कुटुंब त्याचे लग्न करण्याची तयारी करत होते.