बेळगाव : भुतरामट्टी येथे गुरुवारी रोजी पहाटे एका बैलाला ट्रकने ठोकर मारली. त्या अपघातात बैलाला इजा झाली आणि दुर्दैवाने त्याचे दोन्ही पाय मृदू झाले. सुदैव आहे की त्या निष्पाप मुक्या जनावराचा जीव जाण्यापासून वाचला ( अर्थात वाचवला). अपघात झाल्यावर त्या बैलाला तब्बल 30 तासानंतर वाचवण्यात यश आले आहे. रस्त्यावर अपघात झाल्यावर तो खाली आपटला पण दुर्दैव की कोणीही त्याच्याकडे पाहिले नाही.
त्या भागातील एका पुढारी पत्रकाराच्या नजरेत जेंव्हा तो बैल आला तेंव्हा त्यांनी ताबडतोब हा माझा धर्म पशू बचाव दल संघटनेच्या विनायक केसरकर यांच्याशी याबाबत संपर्क साधला. विनायक हे आपल्या सहकाऱ्यांसह तिथे पोहचले आणि त्या बैलाला यशस्वी रीत्या मुक्तीमठ येथील गोशाळेत दाखल केले. या कार्यात विनायक केसरकर यांना मेघन चौगुले, श्री सिध्देश्वर क्रेन सर्व्हिस यांनी मदत केली.