बेळगाव : कोरोनामुळे अनेकांनी आपल्या प्रिय आणि जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. अनेक चिमुकल्यांच्या डोक्यावरील आई-बाबाचं छत्र हरपलं आहे. कोरोनामुळे आई आणि वडील दोघांचाही मृत्यू झाला आहे. दोन्ही पालकांना लहान मुलांपासून त्यांच्या आईवडिलांना कोरोनाने हिरावून घेतलं आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या अशा मुलांच्या भविष्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान अशा अनाथ मुलांची जबाबदारी आता मोदी सरकारने घेतली आहे. कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या अनाथ मुलांसाठी राज्य व केंद्र सरकारकडून मदत दिली जात आहे.
बालसेवा योजनेंतर्गत दरमहा ₹ 3500 रुपये मदत देण्याची सूचनाही जिल्हाधिकार्यांनी केली असून अनाथ मुलांसाठीच्या योजनेला प्रसिद्धी द्यावी, ती सर्वांपर्यंत पोहोचवावी, याबरोबरच संभाव्य तिसर्या लाटेत मुलांच्या संरक्षणासाठी आरोग्य खात्याच्या सहयोगातून प्रत्येकांनी काम करावे, लहान मुलांची संख्या लक्षात घेऊन तालुकास्तरावर औषधांचा साठा करावा, अशी सूचनाही जिल्हाधिकार्यांनी केली.
यावेळी महिला व बालकल्याण खात्याचे उपसंचालक बसवराज वरवट्टी, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ आदींसह विविध खात्याचे अधिकारी व स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. खासकरून महिला सुरक्षेवर कसा भर द्यावा, यावर बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.
मुलं देशाच्या भवितव्याचं प्रतिनिधित्व करतात आणि मुलांना आधार देण्यासाठी, त्यांचं संरक्षण करण्यासाठी देश सर्वतोपरी प्रयत्न करेल, जेणेकरून ते बलवान नागरिक म्हणून विकसित होतील आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल असेल. अशा कठीण काळात कोरोनाच्या कठीण काळात आपल्या मुलांची काळजी घेणं आणि उज्ज्वल भविष्याची आशा बाळगणं हे आपले आपल्या मुलांची काळजी घेणे आणि उज्ज्वल भविष्याची आशा बाळगणे हे आपले कर्तव्य आहे.