बेळगाव : मार्कंडेय नदीला आलेल्या पुरामुळे कंग्राळी खुर्द गावामध्ये पाणी पुरवठ्यात व्यत्यय आला आहे. मागील आठ ते दहा दिवस गावांमध्ये पाणीपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी त्रास होत आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन ग्रामपंचायत सदस्य कल्लाप्पा पाटील व हिंदुराष्ट्र सेना यांच्यावतीने गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यात आला.
यावेळी पैलवान निशांत बसवंत पाटील यांनी शिवमूर्तीचे पूजन केले. तर माजी ग्रामपंचायत सदस्य निंगोजी पाटील यांनी पाणी पुरवठा टँकरचे पूजन केले. याप्रसंगी अमोल पाटील, अमित आढाव, महेश खंडागळे, गजानन पाटील, हभप अनंत मुतगेकर महाराज व ग्रामस्थ उपस्थित होते. या पाणी पुरवठा उपक्रमामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात आले.