बेळगाव ता. खानापूर : घरगुती वाद विकोपाला जावून मुलाने लाकडी अवजाराने डोक्यावर जबर प्रहार करीत बापाची हत्या केली. सावत्र भावांमध्ये मालमत्तेच्या वाटणीवरून उद्भवलेल्या वादातून मुलाने वडिलांचा खून केल्याची घटना हिरे अंग्रोळी (ता. खानापूर) येथे उघडकीस आली. बसवराज विरभद्रप्पा मुनवळी (वय 52)असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
बसवराज यांना दोन पत्नी आहेत. दोन्ही पत्नींच्या मुलांमध्ये पित्याच्या मालमत्तेवरून मतभेद होते. याच वादातून पहिल्या पत्नीचा मुलगा रविराज याने त्याचा नातेवाईक महाबळेश्वर संगप्पा उळागड्डी याच्या मदतीने लाकडी अवजाराने डोक्यात वार करून आपल्या पतीचा खून केल्याची तक्रार दुसरी पत्नी नंदा हिने नंदगड पोलिसांत दिली आहे.
संशयितांविरोधात पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सुरेश शिंगी प्रकरणाचा तपास करत आहेत.